मी पुण्यात २००८-२००९ या वेळेत नवी पेठेत राहायचो. आम्ही तिथे ५ जण होतो. २ बेडरूम चा फ़्लँट होता. मी त्याआधी बँगलोर १.५ वर्ष राहून आलो होतो. मेस चे जेवण खाऊन आम्ही कंटाळलों होतो. मग त्यामुळे आम्ही तिथे स्वंयपाका साठी बाई शोधात होतो. आणि आमची ओळख आज्जीशी झाली.
वय वर्षे ५५.. नऊवारी नेसलेल्या.. कपाळी भलामोठं कुंकु.. चेहरयावर स्मितहास्य.. राहणी अत्यत साधी.. टापटीपपणा.. स्वछता.. स्वंयपाकाची आवड.. रोखठोक बोलणं.. आणि चोख हिशोब.. त्यानी लगेच दुसरया दिवसापासुन स्वंयपाकाला सुरुवात केली. आज्जीमुळे आम्हाला दररोज नवनवीन पदार्थ खायला भेटत. ५ जणा मध्ये माझ्या मित्राचा भाऊ लहान होता. त्याचे आजी खुप लाड करत. पहिल्या १० दिवसात त्यांना सगळ्याच्या खायच्या आवडी-निवडी कळल्या होत्या. आवडीनुसार त्या स्वच्छ, सात्विक जेवण बनवित. कधीहि त्या काम उरकायचे आहे म्हणून करत नसत. परिपूर्ण जेवण बनवण्यात त्यांच्या हाथखंडा होता. त्यांचा स्वंयपाकाला उत्कृष्ट चव होती. उकडीचे मोदक बनण्यात त्या तरबेज होत्या. आज्जी शिळे-अन्नाचा उपयोग खुप चागल्या पद्धतीने करत. दुसरया दिवशी त्या शिळे-अन्नाची अशी काही डिश बनवत की ते खाल्यानंतर असं कधी वाटलंच नाही कि हे शिळे-अन्न आहे. आम्ही पाचीजन लगेच डिश संपवत असत. नारळ असेल तर आज्जी नारळ फोडून उकडीचे मोदक बनवून घरून आणत. काका हलवाई कडे १५-२० रुपयाला मिळणारा मोदक आम्ही फुकटात खात असु. जेव्हा कधी मित्र किवां पाहुणे आले तर आज्जी टाळाटाळ न करता जेवण बनवत असत.