ब्लॉग – लेख – “सोडून द्या”

भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाचे देवत्व आणि पूर्ण अवतार हा विचार बाजूला ठेवून थोडा वेळ त्यांच्या मानवी आयुष्याचे अवलोकन केले तर खूप काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यातून भरपूर आत्मसात करण्या सारखे आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन अथांग समुद्रा सारखे आहे त्यातून आपल्या अल्पमतीला कळेल किंवा हातात जितके पाणी मावेल तितके घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
भगवान श्रीकृष्णाच्या मानवी आयुष्यात खूप चढ उतार आहेत. भावनांचे खूपच सखोल कंगोरे, कठीण परिस्थिती, आणि बुद्धिमत्ता, चातुर्य, अभ्यास, लीला आणि त्यातून होणारे मानवी नात्याचे प्रगटीकरण, आणि मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळक दिसतात. त्यांचे मानवी आयुष्य विविध रंगांनी आणि विविध अंगांनी परिपूर्ण भरलेले आहे. भगवान श्रीकृष्णाला मानवी रुपात अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला.
भगवान श्रीकृष्णानां बासरी वादन, पीतांबर (वस्त्र), लोणी अतिशय प्रिय आहे. जन्म घेतल्या बरोबर आई वडीलांना दूर राहावे लागले. जिथे ते लहानाचे मोठे झाले. खेळले, राक्षसाचा विनाश केला. रासलीला केली. लोणी खाल्ले. गुरांची देखभाल केली. काही वर्षा साठी त्यांना गोकुळ सोडून वृंदावनात जावे लागले. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पण त्या राधेला आणि असंख्य प्रियजणांना वृंदावन सोडून त्यांना मथुरा नगरीत जावे लागले होते. यशोदा माता आणि नंदबाबा, सवंगडी, आणि गोपिका या सगळ्यांचा त्याग केला होता. यशोदा माताने ममतेने पालन पोषण केल्या नंतर सुद्धा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धवाला वृंदावनात पाठवले पण ते स्वत: परत कधीच वृंदावनात गेले नाहीत. असे सांगतात की वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच बासरी वादन केले नाही आणि त्यांनी बासरीचा सुद्धा त्याग करून राधेला देऊन टाकली. वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच लोणी चोरली नाही की खाल्ली सुद्धा नाही.

ब्लॉग – लेख – “सोडून द्या” Read More »