ब्लॉग – व्यक्तीविशेष – “मोठे अण्णा”
राजारामराव (आजोबा) आणि सुभद्रा बाई (आज्जी) यांच्या विवाह वेदीवर प्रकाश हे पहिले अपत्य फुलले. प्रकाश अण्णाची (मोठे मामा) यांची ७५व्या वर्षा निमित्त शर्करा तुला या महिन्याच्या दोन तारखेला उदगीर येथे पार पडली. सगळे त्यांना प्रेमाने “मोठे अण्णा” म्हणतात. तुला करताना मी फोटो काढत होतो. त्याच्या हातात बालाजीचा फोटो आणि डोळ्यात आनंदाअश्रूंनी दाटी वाटी केलेली होती. जसे तुलेचे पारडे समांतर झाले तसे एका क्षणात डोळ्यातून दोन आनंदाअश्रु टपकन ओघळले आणि भावनेच्या समुद्रात लुप्त झाले. ते आनंदाअश्रु नव्हते ते कृतार्थ आणि कृतज्ञ जीवनाचे सार होते. जन्म भर कष्ट घेतल्याचे आणि त्या गोष्टीचे चीज झाल्याचे चेहर्यावर अकस्मात भाव उमटले. त्यांचा माझ्या माहितीतील आणि आठवणीतील जीवन पट समोरून झरकन स्पर्शून गेला. एखाद्या माणसाचा जीवन पट तुम्ही तराजूत तोलू शकत नाही. त्याच प्रमाणे २ पानात माणसाचे आयुष्य मांडू शकत नाही. जवळपास ५१ वर्षा खाली मोठ्या अण्णाचा विवाह निर्मला यांच्याशी संपन्न झाला. आमच्या मातोश्री आणि मोठे अण्णा यांच्या मध्ये जवळपास १४ वर्षाचे अंतर असल्यामुळे माझी आई त्यांना वडील बंधु न समजता पित्रतुल्यच मानते. तो विश्वास अण्णांनी आज ही हृदयात जपून ठेवलाय.
ब्लॉग – व्यक्तीविशेष – “मोठे अण्णा” Read More »

