कविता : काही नाही
काही नाही
काही नाही ओंजळीत माझ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण नाही मनात उत्साह नाही
चंद्र नाही सूर्य नाही आकाशात इंद्रधनुष्य नाही
काही नाही
काही नाही ओंजळीत माझ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण नाही मनात उत्साह नाही
चंद्र नाही सूर्य नाही आकाशात इंद्रधनुष्य नाही
शब्दाचीच आण
शब्दाचाच बाण
शब्दांनाच धार
शब्दाचाच मार
शब्दाचाच निखारा
शब्दाचाच शहारा
शब्दानीच विद्रोही
शब्दाचाच आग्रही
वृत्त वनहरिणी (८+८+८+८=३२)
इच्छा होती बेलाची लाखोळ वहावी मना सारखी
करू आरती निळकंठाची नजर असू दे जरा पारखी
प्रवास नव्हता मुळीच सोपा कष्ट खूप अन खूप अडथळे
लाखोळीचे नियम कडक अन किती सोवळे वेगवेगळे
धार्मिकतेचे वलय श्रावणी सश्रध्द स्वागत करीत असते
पाण्याचा अभिषेक चालतो काकड्यास गर्दी ही असते
बेल वाहण्यासाठी असतो काळ चांगला पहाट वेळी
मुहूर्त गाठायास करावी धावपळीची रोजच खेळी
कविता: बेलाची लाखोळ Read More »
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा
कविता: आठवणींच्या डोहामध्ये Read More »
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा
कविता: आला पाऊस भरून Read More »
काय सांगावी आईची महती
गाता-गाता होते ईश प्राप्ती
शुद्ध होईल मन करता गुणगान
माझी आई माझा स्वाभिमान
निवडक चित्र चारोळी – भाग ८ Read More »
वृत : देवप्रिया
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
2122 2122 2122 212 = एकूण मात्रा: 26
*काळजाला ठेच*
काळजाला ठेच ही, आता भरावी वाटते
मी पणाला विश्रांती, कीर्ती उरावी वाटते
दुसर्याचा आदर्श डोळ्या समोरी का ठेवू
स्व विचारांची वाट आता धरावी वाटते
आसक्त दीर्घ सुखाची वाट कुठे संपली
मानवाला दु:खाची रात्र सरावी वाटते
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा
जमवू मित्रांची मस्त मैफल
काढू प्रत्येकांची पिसे अस्सल
लावू मस्त गप्पा-टप्पाचा फड
कधी-कधी आठवणीं होतील जड
घेऊ महत्त्वाच्या विषयावर सल्ला
एकमेका करून मदत गाठू पल्ला
करू विचाराचे मंथन मांडू मत
पुढील भेटीसाठी देवू विचारांना खत
सोडू कधी सुख दु:खाची शिदोरी
येतील ते स्वर्गीय क्षण पुन्हा माघारी
घेऊ थोडा आयुष्यातून छोटासा ब्रेक
लुटू आनंद हीच जीवनाची खरी मेख
ब्लॉग – कविता: मित्रांची मैफल Read More »
सुहृदय..
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा लागतो
गतकाळाचा सूर्य आठवणीत बुडालेला असतो
निवडक चित्र चारोळी – भाग ७ Read More »