फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य Read More »
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य
फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य Read More »
भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाचे देवत्व आणि पूर्ण अवतार हा विचार बाजूला ठेवून थोडा वेळ त्यांच्या मानवी आयुष्याचे अवलोकन केले तर खूप काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यातून भरपूर आत्मसात करण्या सारखे आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन अथांग समुद्रा सारखे आहे त्यातून आपल्या अल्पमतीला कळेल किंवा हातात जितके पाणी मावेल तितके घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
भगवान श्रीकृष्णाच्या मानवी आयुष्यात खूप चढ उतार आहेत. भावनांचे खूपच सखोल कंगोरे, कठीण परिस्थिती, आणि बुद्धिमत्ता, चातुर्य, अभ्यास, लीला आणि त्यातून होणारे मानवी नात्याचे प्रगटीकरण, आणि मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळक दिसतात. त्यांचे मानवी आयुष्य विविध रंगांनी आणि विविध अंगांनी परिपूर्ण भरलेले आहे. भगवान श्रीकृष्णाला मानवी रुपात अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला.
भगवान श्रीकृष्णानां बासरी वादन, पीतांबर (वस्त्र), लोणी अतिशय प्रिय आहे. जन्म घेतल्या बरोबर आई वडीलांना दूर राहावे लागले. जिथे ते लहानाचे मोठे झाले. खेळले, राक्षसाचा विनाश केला. रासलीला केली. लोणी खाल्ले. गुरांची देखभाल केली. काही वर्षा साठी त्यांना गोकुळ सोडून वृंदावनात जावे लागले. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पण त्या राधेला आणि असंख्य प्रियजणांना वृंदावन सोडून त्यांना मथुरा नगरीत जावे लागले होते. यशोदा माता आणि नंदबाबा, सवंगडी, आणि गोपिका या सगळ्यांचा त्याग केला होता. यशोदा माताने ममतेने पालन पोषण केल्या नंतर सुद्धा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धवाला वृंदावनात पाठवले पण ते स्वत: परत कधीच वृंदावनात गेले नाहीत. असे सांगतात की वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच बासरी वादन केले नाही आणि त्यांनी बासरीचा सुद्धा त्याग करून राधेला देऊन टाकली. वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच लोणी चोरली नाही की खाल्ली सुद्धा नाही.
ब्लॉग – लेख – “सोडून द्या” Read More »
मी अंबाजोगाईला गेलो की योगेश्वरी देवीचे दर्शन घेतो. मी बाईमावशीच्या घरी गेल्या नंतर एक व्यक्ती आवर्जून वाट बघायची आणि अगत्य करायची. लहान मुला पासून ते मोठे पर्यंत सगळेच त्यांना “नाना” या नावाने संबोधन करायचे. नाना मी किती तरी वर्षा पासून पाहतोय शांत, संयंत व्यक्तिमत्व, किडकिडत पण सशक्त अंगकाठी, सावळा अंगवर्ण, पिवळा किंवा क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढरे शुभ्र धोतर आणि बोलण्यात मृदुता. मी त्यांना कधी मोठ्या आवाजात किंवा जोरात बोलताना बघितले नाही. रागात तर येणे लांबच राहिले. किंचित सुद्धा चीडचिड नाही… अतिशय शांत, संयमित आणि सरळ व्यक्तिमत्व…. बोलणे सुद्धा अतिशय कमी…
नानांचा जन्म बीड जिल्ह्यातील मोरफळी गावात झाला. सगळं मोरफळी गाव त्यांना नाना आणि बाईमावशीला नानी म्हणत. मोरफळीला नाना किराणा दुकान आणि शेती करत असत. फक्त आणि फक्त कष्ट आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी मोरफळी ते अंबाजोगाई हा पल्ला गाठला. बाईमावशी वारल्या नंतर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया संयमितच होती. कोणतीही परिस्थिती चटकन स्वीकारणे त्यांना जमायचे. काटक असल्याने कधीही हॉस्पिटलचे जायचा प्रसंग त्यांच्या साठी आला नाही. सगळ्या सोबत त्यांनी देवधर्म यात्रा सुद्धा केल्या आहेत. आई बाबांनी, बाईमावशी, नाना, अक्का, मामा आणि मामी सोबत यात्रा केल्या. आई सांगते त्या आठवणी आणखी ताज्याच आहेत.
बाईमावशी कडे गेल्या नंतर भोजनाला नेहमी सोबत बसणार. मुला साठी काका नेहमी अंबाजोगाईला राहत. त्यांचे अंबाजोगाईला किराणा दुकान होते. अंबाजोगाईला शनिवारी आणि मंगळवारी बाजार असतो. मी सुद्धा दोन-तीनदा बाजारात गेलो होतो. बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. त्या वेळेस मुले बाजार असताना नाना किराणा दुकानात बसायचे आणि पूर्ण दुकान आरामात सांभाळायचे. पहिले पासून दुकानात बसून असल्याने सगळा व्यवहार व्यवस्थित करायचे. पुढे वार्धक्या मुळे दुकानात बसणे कमी झाले. नातवंडाचे अतिशय लाड करत असत. ठराविक वेळे पेक्षा कोणाला(नातवंडाला) यायला वेळ लागत असेल तर ते लगेच मोठ्या सुने कडे विचारपूस करत असत. नाक्या पर्यंत जाऊन-येऊन लक्ष ठेवत असत. माझे मावस भाऊ बांधत असलेले नवीन घराचे त्यांना अतिशय अप्रूप होते. एप्रिल महिन्यात मी अंबाजोगाईला गेलो होतो तर सगळे घर त्यांनी मला फिरवून दाखवले होते. त्यांना तीन मजले चढल्यावर सुद्धा त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत करून नवीन घर बांधत असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यात झळकत होता.
आई वडीलांची मायेची नजर आपल्याला कळत नाही ते नसताना सगळ्यांना त्यांची उणीव भासते. काटक असल्याने नियमित दररोज चालणे हाच त्यांचा आरोग्याचा गुरुमंत्र होता. मी त्यांना कधीही जाड झाल्याचे बघितलेच नाही. घरी छोटी-छोटी काम करणे. मुलांना दुकानात मदत करणे आणि नातवंडांना वेळ देणे याच दोन गोष्टी त्यांनी उतारवयात केल्या. तसे माणसाचे आयुष्य एका रेषेत कधीच नसते पण नाना उतारवयात अनेक वर्ष एकाच सरळ रेषेत आयुष्य जगले.
मागच्या रविवारी परत अंबाजोगाईला बाईमावशीच्या घरी गेलो. वाटले त्या वेळेस आवाज येईल “भागवत कधी आलास. बरा आहेस का?” पण ते शब्द काही कानी पडले नाहीत. कैलासवासी गेलेली माणसे थोडेच बोलणार पण त्यांचे शब्द कायमच लक्षात राहतात.
नाना (कै. शेषाद्री रामभाऊ तारे, अंबाजोगाई मृत्यु – 08/12/2022 )
नानांना शब्दरूपी भावपूर्ण श्रध्दांजली|||
ब्लॉग – व्यक्तीविशेष – नाना Read More »
“युद्धस्य कथा रम्य:” अशी म्हण आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड वाटतात. आणि त्या सोबत एक प्रेम कथा दाखवलेली असेल तर या दोन्हीच्या खास संयोगातून एक प्रकारचे उत्तम समीकरण तयार होते. ऐतिहासिक प्रेम कथा या प्रकारातील चित्रपट आहे. पत्र पाठवणे सुद्धा एक कला आहे. जुन्या काळी पत्र पाठवणे विचारपूस करण्याचे साधन होते. त्यात भावनेने ओथंबलेले, परिस्थितीची जाणीव करून देणारे, मनस्थितीचे सुरेख वर्णन असल्यास काय बघायचे. आपल्या प्रिय आणि आप्त जणांना विचारपूस करता येत होती आणि ती पत्र जतन करून ठेवल्यास त्याच्या सुरेख आणि सुंदर आठवणी आयुष्य भरा साठी पुरतात. याच पत्राचा सुरेख वापर या चित्रपटात केला आहे.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – सीता रामम – युद्धस्य पत्र प्रेमकथा Read More »
संयमाची परीक्षा… संयमानेच घेतली संयमाची परीक्षाहरला संयम राहिल्या फक्त अपेक्षा परिस्थितीनेच केला संयमाचा घातकसे करायचे परिस्थितीशी दोन हात हतबलतेने केले संयमावर अचूक वारकष्टाचा पर्वत चढल्या शिवाय नाही हार पुन्हा संकटांनी ग्रासले संयमाचा ठावआतातरी संयम करेल का भीतीवर घाव मनोबळाने वाढवले संयमाचे अपूर्व बळकेव्हा भेटणार संयम राखल्याचे फळ संयमाला लागली भीतीची परत जाणीवसंयम जिंकेल या प्रयत्नात
कविता : संयमाची परीक्षा… Read More »
आई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्षआश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया शब्द समजेन आता…तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आताओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आतासखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आताक्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता सौंदर्य… अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्यइतरांना आपलंस करणे तुझे औदार्यसखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीचीसगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य
निवडक चारोळी – भाग ७ Read More »
भावनांचा निचरा, स्व विचारांतून मोकळा
भक्तीचा कुंभमेळा, पांडुरंग माझा ||1||
आयुष्याचे गणित, कसा सोडवु मी एकटा
कोडे सोडवण्या आला, पांडुरंग माझा ||2||
मायबापा विठ्ठला, कधी भेटीतो या जीवाला
आस पूरवी आता, पांडुरंग माझा ||3||
वाळवंटी भक्त, कुठे कुठे शोधावे विठ्ठला
कृपा करी देवा, पांडुरंग माझा ||4||
कविता : पांडुरंग माझा Read More »
असे म्हणतात जेवढी गोष्ट लहान असते तेवढीच वैश्विक असते. ग्रामीण जीवनातील इरसाल नमुने, त्यांचा भानगडी, सोपी पण अवघड होऊन बसलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरे, तेथील राजकारण, तेथील जगण्यातून उत्पन्न होणारा संघर्ष आणि विनोद. लोकांचा दृष्टिकोन आणि बाहेरच्या लोकांना वाटणारे अप्रूप किंवा दिसणार्या उणिवा. जगण्यातला साधेपणा आणि सहजपणा, आणि सगळ्या प्रश्नावरील उपाय आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि निखळ विनोद. या सगळ्या गोष्टी पंचायत सिरिज मध्ये उत्तमरित्या परावर्तित झाल्या आहेत.
४ जिवलग मित्र, त्यांची फॅमिली, तिथली माणसे, त्यांचा भन्नाट गोष्टी, त्यात प्रत्येक पात्राची स्वतंत्र कथा आणि त्या सगळ्या मिळून बनलेली एक अजब रसायन म्हणजे पंचायत सिरीज. पहिला भाग अतिशय छान होता. दुसर्या सीजनची अतिशय उत्सुकता होती आणि नुकताच या वेब सिरीजचा दूसरा भाग प्रकाशित झाला आहे.
पहिल्या भागात तशी कथेची सुरुवात होते शहरी भागात शिकलेला मुलगा ग्रामीण भागात ग्राम पंचायत मध्ये सचिव म्हणून रूजू होतो. त्याला तिथे एमबीए च अभ्यास करून लवकरात लवकर जायचे असते. तेथून ज्या रंजक गोष्टी घडायला सुरुवात होते. दुसऱ्या भागात कथा पहिल्या भागात शेवटापासून सुरू होते. जरी सीजन मध्ये ८ एपिसोड असले तरी प्रत्येक एपिसोड मध्ये सुरुवात वरून एपिसोड कसा संपेल त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. ग्रामीण किस्से, इरसाल माणसे, त्यांचे इरसाल बेत आणि मनसुबे, त्यातून घडणाऱ्या गमती-जमती, चार मित्रांची घट्ट मैत्री, एकमेकांना साथ देत त्यातून बाहेर मार्ग काढण्याचे प्रयत्न आणि त्यातून घडणारे खुसखुसीत किस्से यांची मेजवानीच या सीरिज मध्ये आहे .
ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – पंचायत सीजन २ – इरसाल नमुने आणि निखळ दोस्ताची दुनियादारी Read More »