ब्लॉग : चित्रपट परिक्षण – सीता रामम – युद्धस्य पत्र प्रेमकथा

“युद्धस्य कथा रम्य:” अशी म्हण आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड वाटतात. आणि त्या सोबत एक प्रेम कथा दाखवलेली असेल तर या दोन्हीच्या खास संयोगातून एक प्रकारचे उत्तम समीकरण तयार होते. ऐतिहासिक प्रेम कथा या प्रकारातील चित्रपट आहे. पत्र पाठवणे सुद्धा एक कला आहे. जुन्या काळी पत्र पाठवणे विचारपूस करण्याचे साधन होते. त्यात भावनेने ओथंबलेले, परिस्थितीची जाणीव करून देणारे, मनस्थितीचे सुरेख वर्णन असल्यास काय बघायचे. आपल्या प्रिय आणि आप्त जणांना विचारपूस करता येत होती आणि ती पत्र जतन करून ठेवल्यास त्याच्या सुरेख आणि सुंदर आठवणी आयुष्य भरा साठी पुरतात. याच पत्राचा सुरेख वापर या चित्रपटात केला आहे.

ब्लॉग : चित्रपट परिक्षण – सीता रामम – युद्धस्य पत्र प्रेमकथा Read More »

कविता : संयमाची परीक्षा…

संयमाची परीक्षा… संयमानेच घेतली संयमाची परीक्षाहरला संयम राहिल्या फक्त अपेक्षा परिस्थितीनेच केला संयमाचा घातकसे करायचे परिस्थितीशी दोन हात हतबलतेने केले संयमावर अचूक वारकष्टाचा पर्वत चढल्या शिवाय नाही हार पुन्हा संकटांनी ग्रासले संयमाचा ठावआतातरी संयम करेल का भीतीवर घाव मनोबळाने वाढवले संयमाचे अपूर्व बळकेव्हा भेटणार संयम राखल्याचे फळ संयमाला लागली भीतीची परत जाणीवसंयम जिंकेल या प्रयत्नात

कविता : संयमाची परीक्षा… Read More »

निवडक चारोळी – भाग ७

आई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्षआश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया शब्द समजेन आता…तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आताओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आतासखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आताक्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता सौंदर्य… अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्यइतरांना आपलंस करणे तुझे औदार्यसखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीचीसगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य

निवडक चारोळी – भाग ७ Read More »

कविता : पांडुरंग माझा

भावनांचा निचरा, स्व विचारांतून मोकळा
भक्तीचा कुंभमेळा, पांडुरंग माझा ||1||

आयुष्याचे गणित, कसा सोडवु मी एकटा
कोडे सोडवण्या आला, पांडुरंग माझा ||2||

मायबापा विठ्ठला, कधी भेटीतो या जीवाला
आस पूरवी आता, पांडुरंग माझा ||3||

वाळवंटी भक्त, कुठे कुठे शोधावे विठ्ठला
कृपा करी देवा, पांडुरंग माझा ||4||

कविता : पांडुरंग माझा Read More »

ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – पंचायत सीजन २ – इरसाल नमुने आणि निखळ दोस्ताची दुनियादारी

असे म्हणतात जेवढी गोष्ट लहान असते तेवढीच वैश्विक असते. ग्रामीण जीवनातील इरसाल नमुने, त्यांचा भानगडी, सोपी पण अवघड होऊन बसलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरे, तेथील राजकारण, तेथील जगण्यातून उत्पन्न होणारा संघर्ष आणि विनोद. लोकांचा दृष्टिकोन आणि बाहेरच्या लोकांना वाटणारे अप्रूप किंवा दिसणार्‍या उणिवा. जगण्यातला साधेपणा आणि सहजपणा, आणि सगळ्या प्रश्नावरील उपाय आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि निखळ विनोद. या सगळ्या गोष्टी पंचायत सिरिज मध्ये उत्तमरित्या परावर्तित झाल्या आहेत.
४ जिवलग मित्र, त्यांची फॅमिली, तिथली माणसे, त्यांचा भन्नाट गोष्टी, त्यात प्रत्येक पात्राची स्वतंत्र कथा आणि त्या सगळ्या मिळून बनलेली एक अजब रसायन म्हणजे पंचायत सिरीज. पहिला भाग अतिशय छान होता. दुसर्‍या सीजनची अतिशय उत्सुकता होती आणि नुकताच या वेब सिरीजचा दूसरा भाग प्रकाशित झाला आहे.
पहिल्या भागात तशी कथेची सुरुवात होते शहरी भागात शिकलेला मुलगा ग्रामीण भागात ग्राम पंचायत मध्ये सचिव म्हणून रूजू होतो. त्याला तिथे एमबीए च अभ्यास करून लवकरात लवकर जायचे असते. तेथून ज्या रंजक गोष्टी घडायला सुरुवात होते. दुसऱ्या भागात कथा पहिल्या भागात शेवटापासून सुरू होते. जरी सीजन मध्ये ८ एपिसोड असले तरी प्रत्येक एपिसोड मध्ये सुरुवात वरून एपिसोड कसा संपेल त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. ग्रामीण किस्से, इरसाल माणसे, त्यांचे इरसाल बेत आणि मनसुबे, त्यातून घडणाऱ्या गमती-जमती, चार मित्रांची घट्ट मैत्री, एकमेकांना साथ देत त्यातून बाहेर मार्ग काढण्याचे प्रयत्न आणि त्यातून घडणारे खुसखुसीत किस्से यांची मेजवानीच या सीरिज मध्ये आहे .

ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – पंचायत सीजन २ – इरसाल नमुने आणि निखळ दोस्ताची दुनियादारी Read More »