कविता: परत पुन्हा
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा
घेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
जीवनाच्या निळ्याशार आकाशात विजा कडाडल्या पुन्हा
हे ही दिवस जातील चांगले दिवस येतील परत पुन्हा
आज सुमेधच्या घरी इडली आणि वडा हा नाष्टाचा बेत ठरला होता. सुमेध अप्पा सोबत घरी सकाळच्या नाष्टाची वाट बघत बसला होता. स्वयंपाक घरातील काम संपवून सुमेधची आई “सरिता” आणि पत्नी “मेघा” नाष्टा घेऊन आल्या. अप्पाचा दंडक होता की दररोज रात्री जेवण आणि सुट्टीच्या दिवशी सकाळचा नाष्टा एकत्रच केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाचे एकमेकांशी बोलणे आणि आठवड्या भरची चर्चा व्हायची. बोलता-बोलता सुमेधच्या ऑफिसचा विषय निघाला. काल सुमेधने ऑफिस व्यवस्थापनाशी विविध मुद्द्यावर विरोध प्रगट करण्यासाठी ईमेल पाठवला आहे. त्यानंतर मॅनेजमेंटच्या लोकांनी त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलवले आहे. सुमेधला त्याचे ऑफिस मधले मित्र सांगतात की उगाच नुसती उठाठेव आणि बंडखोरपणा करण्यात काही अर्थ नाही आणि सुमेधने मॅनेजमेंटच्या लोकांच्या विरोधात जाऊन काहीही साध्य होणार नाही. उलट त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागेल असे मित्रांनी असा सल्ला दिला.
तुम्ही लहानपणी विक्रम वेताळची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणत्याही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.
ब्लॉग : चित्रपट परीक्षण : Drishyam 2 – The Resumption : – जबरदस्त, उत्कंठावर्धक सिक्वेल Read More »