कविता – मातृत्व आणि कारकीर्द
नवा सूर्य अन नवी आशा
नवीन पर्व अन नवीन दिशा
अपत्यासाठी तीन वर्ष कार्य विराम
मुल अन कारकीर्द यांना नाही विश्राम
कविता – मातृत्व आणि कारकीर्द Read More »
नवा सूर्य अन नवी आशा
नवीन पर्व अन नवीन दिशा
अपत्यासाठी तीन वर्ष कार्य विराम
मुल अन कारकीर्द यांना नाही विश्राम
कविता – मातृत्व आणि कारकीर्द Read More »
तुषारचा आज ऑफिस मध्ये शेवटचा दिवस होता. त्याच संध्याकाळी त्याने ऑफिस मधील मित्रांना पार्टी साठी बोलावले होते. त्यासाठी त्याने सगळ्यांना तशी ई-मेल केली होती. त्यात मंगेशला सुद्धा आमंत्रण दिले होते. तुषार आणि मंगेश मध्ये काही विशेष मित्रत्वाचे संबंध नव्हते. पण त्याला स्वत:ला मंगेशला आमंत्रित करावेसे वाटले. यांचे उत्तर तुषार कडे नव्हते.
पण मंगेश पार्टीला आला आणि त्याने खूप मौज मस्ती केली. तुषारला वाटले की तो स्वतः कंपनी सोडून जाणार आहे आणि त्यामुळे मंगेशच्या मार्गातील काटा निघाला म्हणून मंगेश खुष आहे का? की मित्राच्या आनंदात मंगेश खुष आहे हे समजत नव्हते. पण दोघांनी जेवण मस्त पैकी एन्जॉय केले. त्यांच्या सोबत बरीच मित्र मैत्रिणी सुद्धा होत्या. सगळे एकमेकांच्या आठवणी सांगण्यात मशगुल झाले होते.
लघुकथा – निरोप समारंभ Read More »
ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात
Photography: Magical Sunset view from my balcony Photography: Another Sunset view from my balcony Photography: Stunning sunset view from my balcony Photography: Cloud seen from my balcony Photography: Older women in palkhi at Lenyadri cave Photography: Beautiful road view from Lenyadri cave Photography: View from Mumbai – Pune Expressway Photography: Sunset view Views: 38
ब्लॉग : फोटोग्राफी – काही क्षणचित्रे Read More »
चित्रपटाची सुरुवात एका व्याखाना पासून सुरू होते. सचिन खेडकर हा व्याखान निमंत्रित म्हणून त्यांच्या एक मित्राची गोष्ट प्रेक्षकांना सांगतो. खरे तर ती कथा त्याची स्वत:चीच असते. हीच चित्रपटाची कथा आहे. या कथेचा नायक अविनाश पाठक (सचिन खेडेकर) आहे. हा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर असतो. पण नवीन तंत्रज्ञाना सोबत त्याला जुळवून घेता येत नाही म्हणून तो सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असतो. आसावरी(इरावती हर्षे) त्याची पत्नी एक शैक्षणिक सल्लागार आहे. पण तिला नवीन पिढी सोबत जुळवून घ्यायला अवघड जात आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. त्यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे) बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे कॉमर्सला असते. अविनाश घरच्यांचा विरोध पत्करून निवृत्ति घेतो. ऐच्छिक निवृत्तिसाठी त्याला ५० लाख मिळतात.
चित्रपट परिक्षण – tc.gn – टेक केअर गुड नाईट – साइबर गुन्हा आणि वास्तव Read More »
मैत्राला सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे मैत्रा आणि मिहीर गाडीने जळगाव जवळच्या त्याच्या गावी जायला निघाले. गावातील वाड्यात पोहचले. चिरेबंदी वाडा, खानदानी कुटुंब आणि छान माणसे यांनी वातावरण भरून गेल होत. तिथे त्यांना पाहून मिहीरच्या आईला अति आनंद वाटला. सगळे त्यांच्या आकस्मिक भेटण्याने भारावून गेले. तिथे तिला मिहीरचे सगळे कुटुंबच भेटले. मिहीर आला म्हणल्या नंतर सगळेच त्यांच्या मायेची माणसे जमा झाली. विशेष करून आई, बहिण ‘एकता’, ‘सई’ वाहिनी, पुतण्या ‘आकाश’ आणि इतर मंडळी हजर होती. ‘एकताने’ सांगीतले तिच्या सासूबाईला सगळे प्रेमाने “अक्का” म्हणतात. सगळा वाडा मैत्राला दाखवला. “एकता” मिहीर पेक्षा ३ वर्षानी मोठी होती. अक्काच्या खोलीत मिहीर आणि मैत्राचा फोटो बरेच काही सांगून जात होता. कुटुंब बघून मैत्राला चांगले वाटले पण मिहीर कुटुंबा पासून लांब का आहे यांचे कोडे उलगडले नव्हते.
कथा : मैत्रा – भाग २ Read More »
मैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ… छान आल्हाददायक वातावरण… मंद सुटलेली हवा… यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.
कथा : मैत्रा – भाग १ Read More »
मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.
“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.
ब्लॉग : तीन क्रीडारत्न Read More »